BREAKING NEWS : लाडक्या बहिणींनो, 1500 ऐवजी 2100 रुपये; कधी मिळणार? मोठी घोषणा
लाडकी बहीण’ योजनेचे २१०० रुपये कधी मिळणार? — एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा खुलासा
राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चर्चेत असताना, या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ₹1500 वरून ₹2100 कधी होणार, याबद्दल महिलांमध्ये उत्सुकता आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नगर जिल्ह्यातील कार्यक्रमात प्रतिक्रिया
शनिवारी नगर जिल्ह्यातील अकोले येथे आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “मी केवळ उपमुख्यमंत्री नाही, तर शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. माझ्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. हा पक्ष मालक आणि कामगारांचा नसून, कार्यकर्त्यांचा आहे. कालही मी कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ताच आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या लाडक्या बहिणींना मनःपूर्वक शुभेच्छा.”
“योजना कधीही बंद होणार नाही” — विरोधकांना प्रत्युत्तर
योजनेबाबतच्या विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही दिलेले वचन टप्प्याटप्प्याने नक्कीच पूर्ण करणार आहोत. सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही, पण महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सुवर्णकाळ आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तसेच, एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकांना त्रास होत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
कर्जमाफीबाबत सकारात्मक संकेत
शिंदे पुढे म्हणाले, “या योजनेवर कितीही टीका झाली तरी ती बंद होणार नाही. आम्ही दिलेले वचन पाळू आणि ते ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे कधीच सांगणार नाही.” यासोबतच त्यांनी कर्जमाफीबाबतही लवकरच मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले. “माझ्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. पदे येतात आणि जातात, पण लाडका भाऊ म्हणून मिळालेली पदवी माझ्यासाठी सर्वात मोठी आहे,” असे ते म्हणाले.
महिला व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा पुढील टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ₹2100 रुपयांचा हप्ता लवकरच मिळेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. याशिवाय, कर्जमाफीबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील महिला आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी व दिलासादायक बातमी आहे.