राज्यात १७०० जागांसाठी तलाठी भरती होणार Talathi Bharti 2025
Talathi Bharti 2025: सध्या राज्यात तलाठ्यांच्या २४७१ जागा रिक्त झालेल्या असून. यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार सोपवला गेलेले आहेत. यामुळे गावातील आणि शेतकऱ्यांची अनेक कामे थांबलेली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच १७०० पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळालेली आहेत. अनेक वर्षांपासून ही भरती देखील रखडली होती, त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही भरती तातडीने सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरत आहे.
राज्याचा महसूल विभाग हा शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे, कारण या विभागाकडूनच राज्याला सर्वाधिक महसूल मिळत आहे. या विभागात सुमारे ३,००० पदे रिक्त झालेले आहेत, त्यापैकी २४७१ पदे ही केवळ तलाठ्यांची आहेत. यामुळे एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार उपविण्यात आलेला आहे, ज्यामुळे कामाला गती मिळत नाहीत आणि लोकांची कामे वेळेवर होत नाही. तलाठ्यांच्या रिक्त जागांमुळे अनेक शासकीय योजना आणि शेतकऱ्यांची कामे थांबली आहे, ज्यात सातबारा, शेतसारा वसुली, गारपीट पंचनामे आणि निवडणुकांची कामे यांचा समावेश आहेत.
सध्या तलाठी हे गावपातळीवरचे एक महत्त्वाचे पद असून, त्यांच्यावरील कामाचा ताण खूप वाढलेला आहे. त्यामुळे, २०२५ मध्ये होणारी ही भरती प्रक्रिया लवकर सुरू होणे आवश्यक आहेत, ज्यामुळे प्रशासकीय कामे सुरळीत चालतीन. सरकारने या दिशेने पाऊल उचलले असून ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहेत.